Homeताज्या बातम्यासंपादकीय

केंद्रीकरण आणि विकास

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे मुंबईमध्ये प्रसिद्ध असे बॉलीवूड क्षेत्र आहे, त्याचबरोबर उद्योगधंदे, प्रामुख्या

पाणीटंचाईचे संकट
दहशतवादाची कीड ठेचण्याचे आव्हान
महाराष्ट्रातील ‘उद्योग’

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे मुंबईमध्ये प्रसिद्ध असे बॉलीवूड क्षेत्र आहे, त्याचबरोबर उद्योगधंदे, प्रामुख्याने मुंबईत आहेत. कोट्यावधींची उलाढाल मुंबईत होते, अनेक डील्स मुंबईत होतात. ज्याप्रकारे अभिनेते-अभिनेत्री मुंबईत वास्तव्यास आहेत, त्याचप्रकारे अनेक उद्योगपती देखील मुंबईत वास्तव्यास आहेत. मात्र मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणत असतांना, या शहराचा सुयोग्य अशा नियोजनाद्वारे विकास होतांना दिसून येत नाही. कारण शहराभोवती झोपडपट्ट्या, वाढता भ्रष्ट्राचार आणि अपरिहार्यपणे या विकासाला चिकटलेली असह्य जीवघेणी गुन्हेगारी आणि तरीही अविरत वाढत चाललेले जीवनखर्च या कचाट्यात कथित विकसीत क्षेत्रांत राहणार्‍या जनसामान्यांच्या वाट्याला आलेले अपरिहार्य भाग्य दिसून येत आहे. खरंतर सर्वांना समस्यांच्या मुळाशी न जाता वरकरणीची सोपी आणि मलमपट्ट्या करणारी उत्तरे हवी असतात. आज मुंबईत जवळपास तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीनींवर झोपडपट्ट्या आहेत. जवळपास 40 टक्के मुंबई झोपडपट्ट्यांत राहते असे अंदाज आहेत. बेकायदेशीर बांधकामांनी व्यापलेला भाग जवळपास चारशे हेक्टर एवढा आहे. हे अंदाज काहीही असोत, वास्तव एवढेच आहे कि मुळात एवढी लोकसंख्या मुंबईत स्थलांतरीत का झाली? हा एक चक्रव्युह आहे हे आधी आपण समजावून घ्यायला पाहिजे. मुंबईत अनेक उद्योग-व्यवसाय आणि त्यात राजधानी असल्याने असंख्य केंद्र व राज्य सरकारी कार्यालये केंद्रीत होत गेले म्हणुन तेथील अधिकारी ते कर्मचारी व कामगार स्वाभाविकपणे स्थायिक होत गेले. या जनसमुहाच्याही असंख्य गरजा असतात ते पुरवणारेही तेथे येत जाणेही तेवढेच स्वाभाविक होऊन गेले. या गरजा पुरवणार्‍यांच्याही अन्य गरजा असतात त्याही भागविण्यासाठी, सरकारी असो कि खाजगी, जनसंख्या लागत जाते. यातुनच चक्रवाढ पद्धतीने लोकसंख्या एकाच ठिकाणी केंद्रीभूत होऊ लागते. मुंबईचे (व अन्य शहरांचेही) नेमके असेच होत गेले आहे. असे कोणते उद्योग होते जे फक्त मुंबईतच उभारले जावू शकत होते? कापड उद्योग हे स्वाभाविक आणि नैसर्गिक कारण आहे. पण हा उद्योग संपुष्टात येऊन आता काळ उलटला. रस्ते व रेल्वे या पायाभूत सुविधा सुरुवातीपासून निर्माण केल्या गेल्या असत्या तर निर्यातप्रधान उद्योग मुंबईत राहण्याचे अथवा उभारले जाण्याचे कारणच नव्हते. मुंबई खरे तर फक्त व्यापार-विनिमयाचे केंद्रक बनवले जाणे धोरणात्मक दृष्टीने गरजेचे होते. पण उद्योगांचेही (अगदी सिनेसृष्टीचेही) केंद्रीकरण तेथेच (मर्यादित भौगोलिक अवकाश असतांनाही) होत गेल्याने आज मुंबई ही एक गंभीर समस्या बनली आहे व ती भविष्यात विक्राळ होईल याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. आणि याला विकास म्हणता येत नाही. मुंबई हे एक उदाहरण म्हणुण घेतले आहे, पुणे, नाशिक, औरंगाबाद इत्यादी त्याच वाटेवर चालत आहेत. मात्र ज्या मराठवाड्यात कापूस मोठ्या प्रमाणावर होतो तेथेच नेमके कापड उद्योग सोडा किती सूतगिरण्या उभारल्या गेल्या? यंदा तर म्हणे नाफेडही कापसाची खरेदी करणार नाही, मग शेतकर्‍यांनी कापसाचे काय करायचे? एव्हाना मराठवाड्याचा कापड उद्योग आणि तेल उद्योगातून मोठा विकास साधता आला नसता काय? त्यामुळे संलग्न उद्योगांची वाढ झाली नसती काय? पण हे केले गेले नाही.प्रत्येक प्रदेशाचे अंगभूत असे वैशिष्ट्य असते. विदर्भत विपूल खनीजसंपत्ती आहे. आम्हाला खाणींचे लिलाव करत खनिजे निर्यात करण्यात अधिक रस आहे. परंतु त्यांच्यावर येथेच प्रक्रिया करत उत्पादने निर्यात करण्यात फारसा रस नाही.  त्यामुळे मुंबईचा विकास हा नियोजनबद्धरित्या होण्याची गरज आहे. मात्र मुंबई शहराभोवती राजकारणांचे असणारे वलय आणि त्यांच्या आर्थिक देवणा-घेवाणीपोटी मुंबईचा विकास रखडत चालला आहे. 

COMMENTS