Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौताळा अभयारण्यात 15 सप्टेंबरपर्यंत बंदी

छ.संभाजीनगर ः लोणावळ्यातील बुशी डॅम परिसरात पाच जण वाहून गेल्याच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक पर्यटनस्थळांवर जा

कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सजग राहण्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांचे आवाहन
मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर निर्णय
1 मेपासून मराठा समाजाचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

छ.संभाजीनगर ः लोणावळ्यातील बुशी डॅम परिसरात पाच जण वाहून गेल्याच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक पर्यटनस्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गौताळा अभयारण्यात देखील पर्यटकांना 15 सप्टेंबरपर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे भर पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. पावसाळा सुरु झाला की पर्यटकांची गर्दी गौताळा अभयारण्याकडे वळताना दिसते. मात्र पावसाळ्यात पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे खबरदारी म्हणून तीन महिने पर्यटकांना याठिकाणी प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.

COMMENTS