Homeताज्या बातम्या

वाळूतस्करांवर कारवाई होते, मग ४२ कोटींच्या बोगस वृक्षलागवडीची चौकशी का नाही? डॉ. गणेश ढवळेंचा आ. विजय सिंह पंडितांना सवाल

बीड: गोदावरी पट्ट्यातील वाळू तस्करी प्रकरणात महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्‍यांवर चौकशी होऊन कारवाई होत आहे. मात्र बीड जिल्ह्या

नगर अर्बन बँक घोटाळा : माजी संचालक अजय अमृतलाल बोराचा अटकपूर्व जामीन फेटाळला
अहिल्यादेवी होळकर मिरवणूक नगर शहरात ठरली आकर्षण 
आई अन् पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाने फरफटत नेलं | LOK News 24

बीड: गोदावरी पट्ट्यातील वाळू तस्करी प्रकरणात महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्‍यांवर चौकशी होऊन कारवाई होत आहे. मात्र बीड जिल्ह्यात वनविभागातील वनीकरण कामे आणि कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या वृक्षलागवड प्रकरणाची साधी चौकशीही होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.

आ. विजय सिंह पंडित यांच्या तक्रारीनंतर वाळू तस्करीवर धडक कारवाई झाली, त्याच धर्तीवर वनविभागातील ४२ कोटी रुपयांच्या कथित बोगस वृक्षलागवड प्रकरणाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी आ. विजय सिंह पंडित यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी वनमंत्री गणेश नाईक, वन विभागाचे सचिव, मंत्रालय मुंबई तसेच जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिले आहे. बीड जिल्ह्यातील वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार सुरू असून शासन निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत ७ ऑगस्ट २०२५ रोजी नियम डावलून वृक्षलागवड करण्यात आली असून केवळ रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी केलेल्या या कामामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेल्याचा दावा करण्यात आला आहे. निवेदनात वृक्षलागवड नियोजनातील त्रुटी, निकृष्ट रोपांची लागवड, रोपवनाच्या वेळापत्रकाकडे दुर्लक्ष, निधी वितरणातील असमतोल, कंत्राटदारांशी संगनमत, तसेच साहित्य खरेदी प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

फायर ब्लोअर, ड्रोन, जीपीएस मशीन आदी साहित्य खरेदी करताना शासन नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप करत मागील तीन वर्षांत वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या कामांचे स्वतंत्र मूल्यांकन करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाळू तस्करीप्रकरणी लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर प्रशासन हलते, मात्र वनविभागातील गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जाते. जर आमदारांच्या तक्रारीनंतरही चौकशी होत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे काय? असा सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे. सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. गणेश ढवळे यांनी दिला आहे.

COMMENTS