इंदूर: इंदूरमधील गाजलेल्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिला सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ग

इंदूर: इंदूरमधील गाजलेल्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिला सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. गुरूवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने तिचा जामीन रद्द केला आहे.
यापूर्वी २१ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सोनमला आत्मसमर्पण करण्याचा सल्ला देत तिच्यासमोर दोन पर्याय ठेवले होते. पहिला पर्याय म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने मेघालय सरकारच्या अपिलावर तिचा युक्तिवाद ऐकून अंतिम आदेश पारित करावा. तर दुसरा पर्याय, सोनमने आत्मसमर्पण करावे, जेणेकरून तपास यंत्रणा तिची सखोल चौकशी करू शकतील आणि या काळात तिच्या जामिनावरही पुनर्विचार केला जाऊ शकेल.
मात्र, गुरूवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तिचा जामीन रद्द करण्याचा निर्णय दिल्यामुळे सोनम रघुवंशीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

COMMENTS