Homeताज्या बातम्या

एअर इंडियाचे विमान पाकिस्तान हवाई हद्दीत घुसले! तांत्रिक बिघाडामुळे मार्ग भरकटल्याने खळबळ

अमृतसर: दिल्लीहून अमृतसरसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे एक विमान तांत्रिक बिघाडामुळे मार्ग भरकटून थेट पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसल

के. एस. पी. विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा! विद्यार्थ्यांचे योगासन प्रात्यक्षिक
निर्भिड सामाजिक योद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने डॉ. गणेश ढवळे सन्मानित; बीडमध्ये भव्य सोहळ्यात गौरव
ऊसतोड कामगारांची नोंदणी तातडीने आणि अचूकपणे पूर्ण करावी – आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे; जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे गट विकास अधिकार्‍यांना आदेश

अमृतसर: दिल्लीहून अमृतसरसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे एक विमान तांत्रिक बिघाडामुळे मार्ग भरकटून थेट पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसल्याची धक्कादायक घटना सोमवार रात्री घडली. या घटनेमुळे दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये काही काळ खळबळ उडाली होती. मात्र, पाकिस्तानच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाने (CAA) तातडीने इशारा देऊन या विमानाला पुन्हा भारतीय हद्दीत परत पाठवले.

हे विमान दिल्लीहून अमृतसरच्या दिशेने येत होते. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा मार्ग बदलला आणि ते पाकिस्तानी हद्दीत दाखल झाले. पाकिस्तानने इशारा दिल्यानंतर विमान सुरक्षितपणे भारतीय हद्दीत परत आले खरे, पण तोपर्यंत अमृतसर विमानतळावर हवाई वाहतुकीचा ताण (रश) मोठ्या प्रमाणावर वाढला होता.

अमृतसर विमानतळावर उतरण्यास जागा उपलब्ध नसल्याने अखेर खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान पुन्हा दिल्लीकडे वळवण्यात आले आणि तिथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानामध्ये नेमका काय तांत्रिक बिघाड झाला होता आणि मार्ग कसा भरकटला, या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

COMMENTS