पंढरपूर : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सरकारविरोधातील भूमि

पंढरपूर : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सरकारविरोधातील भूमिका अधिक तीव्र केली. कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत विनाअट कर्जमाफी जाहीर होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अन्नत्याग आंदोलनादरम्यान रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावल्याची माहिती समोर आली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) घटल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत असून वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. कुटुंबीयांना या आंदोलनामुळे भावनिक ताण सहन करावा लागत असल्याचे सांगताना त्यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचे नमूद केले.

COMMENTS