Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारला गॅस बंद करून स्टोव्ह चालू करायचे आहे का? – शेख युनूस

बीड : महाराष्ट्र सरकारकडून बीड जिल्ह्यासाठी 1.20 लाख लिटर रॉकेल मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा साठा जिल्ह्यातील 1977 स्वस्त धान्य

आ. संदीप क्षीरसागरांची महसूलमंत्र्यांशी भेट; अनेक प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला आढावा
प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण;अपमान आणि धमक्यांमुळे गळफास घेऊन आत्महत्या

बीड : महाराष्ट्र सरकारकडून बीड जिल्ह्यासाठी 1.20 लाख लिटर रॉकेल मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा साठा जिल्ह्यातील 1977 स्वस्त धान्य दुकानांमार्फत नागरिकांना वितरित केला जाणार असून, प्रत्येक कुटुंबाला सुमारे तीन लिटर रॉकेल देण्यात येणार आहे.
मात्र, यापूर्वी बंद करण्यात आलेले रॉकेल पुन्हा सुरू करण्यामागे सरकारचा नेमका हेतू काय आहे, असा सवाल शेख युनूस यांनी उपस्थित केला आहे. गॅस युगात परत स्टोव्ह वापरण्याची वेळ आणायची आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. रॉकेल स्टोव्हमुळे पूर्वी अनेक अपघात झाले असून, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. तसेच काही महिलांनी आत्महत्येसाठी रॉकेलचा वापर केल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. त्यामुळे पुन्हा रॉकेल वितरण सुरू केल्याने अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, रॉकेलचा वापर पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ करण्यासाठी तर होणार नाही ना, अशी शंका देखील नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. सरकारने या निर्णयामागील स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.

COMMENTS