Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यातील 67 हजार दूध उत्पादक शेतकर्‍यांना 61 कोटींचे अनुदान

अहमदनगर ः राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्ह्यातील 67 हजार दूध उत्पादक शेतकर्‍यांना झाला असून, या अनुदानापोटी सुमारे 61 कोटी रुपये

साखरेचा आधारभूत विक्री दर 4500 रुपये करावा
वंचितां समवेत भोजन करून पोलिस अधीक्षकांचे काम सुरू
श्रीरामपूर शहरातून आरोग्य दिनानिमित्त वॉकेथॉन रॅली

अहमदनगर ः राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्ह्यातील 67 हजार दूध उत्पादक शेतकर्‍यांना झाला असून, या अनुदानापोटी सुमारे 61 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या बॅक खात्यात वर्ग झाले आहेत. राज्य सरकारच्या वतीने दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्याकरीता 5 रुपये अनुदानाची योजना सुरु केली होती. मात्र तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग होण्यात अडथळे निर्माण होत होते. दूग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने अनुदानासाठी लावण्यात आलेल्या अटी आणि नियमांमध्ये शिथीलता केल्यामुळे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग होण्यात मोठी मदत झाली. जिल्ह्यातील 67 हजार शेतकर्‍यांना थेट लाभ मिळाला असल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली.
       अकोले तालुक्यातील 2 हजार 725 शेतकर्‍यांना 15 कोटी 24 लाख 96 हजार, संगमनेर तालुक्यातील 17 हजार 119 शेतकर्‍यांना 12 कोटी 10 लाख 63 हजार, कोपरगाव तालुक्यातील 7 हजार 92 शेतकर्‍यांना 5 कोटी 16 लाख 12 हजार, राहाता तालुक्यातील 12 हजार 5 शेतकर्‍यांना 11 कोटी 60 लाख 67 हजार, श्रीरामपूर तालुक्यातील 6 हजार 454 शेतक-यांना 5 कोटी 82 लाख 31 हजार, नगर तालुक्यातील 2 हजार 138 शेतकर्‍यांना 21 कोटी 55 लाख 7 हजार, नेवासा तालुक्यातील 4 हजार 68 शेतक-यांना 4 कोटी 82 लाख 40 हजार, पारनेरमध्ये 5 हजार 814 शेतकर्‍यांना 4 कोटी 82 लाख 40 हजार, पाथर्डी तालुक्यातील 278 शेतकर्‍यांना 2 कोटी 75 लाख 34 हजार, राहुरी तालुक्यातील 12 हजार 5 शेतक-यांना 11 कोटी 60 लाख 67 हजार आणि श्रीगोंदा तालुक्यातील 6 हजार 454 शेतकर्‍यांना 5 कोटी 82 लाख 31 हजार एवढे अनुदान प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील काही शेतकरी शेजारील जिल्ह्यातील दूध संघाना दूध पुरवठा करत आहेत. अशा शेतक-यांची माहीती विभागाने संकलित केली असून, हे दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहु नयेत म्हणून, त्यांनाही अनुदनाचा लाभ मिळाला आहे. अशा शेतकर्‍यांची संख्या ही 29 हजार 441 असून, या शेतकर्‍यांना 5 कोटी 23 लाख 66 हजार 915 रुपयांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहु नये यासाठी विभागाने 15 एप्रिल पर्यंत मुदत वाढविली असल्याचेही विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

COMMENTS