Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

22 महिन्यांच्या पगारासाठी 400 कामगारांचा ’किसन वीर’ समोर ठिय्या

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यामधील कामगारांना 22 महिन्यांपासून पगार न

खंडाळ्यात आढळले दुर्मीळ वाघाटी रानमांजर
एफआरपीचा बैठकीत निर्णय न झाल्यास आंदोलन; ’बळीराजा’चा इशारा
पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल महारॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद : मनोहर शिंदे

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यामधील कामगारांना 22 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने सोमवार, दि. 21 रोजी त्यांनी कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सुमारे 400 पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले आहेत.
शेतकर्‍यांनी गाळपासाठी दिलेल्या उसाची बिले अदा करण्यास किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना अपयशी ठरला होता. त्यामुळे शासकिस यंत्रणेने दिलेल्या आदेशानुसार तसेच शेतकर्‍यांची थकबाकी देण्याबाबत कोणतेही नियोजन संचालक मंडळ करू शकले नाही. त्यामुळे भुईंज येथील हा कारखान्यास गाळप परवारना साखर आयुक्तांनी दिला नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कारखाना बंद आहे. त्यामुळे यावर्षी गाळप होऊ शकलेले नाही. परिणामी या कारखान्यातील कामगारांना गेल्या बावीस महिन्यांपासून पगार मिळाला नाही.
या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात सुमारे 400 कामगार सहभागी झाले आहेत. यावेळी कारखान्यातील ज्येष्ठ कामगार म्हणाले, माजी आमदार आणि विद्यमान अध्यक्ष मदन भोसले आजही हा कारखाना चालावा यासाठी आणि आमच्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे आम्हांला माहिती आहे. परंतू आमची सहनशीलता संपली आहे. वाढत्या महागाईमुळे आमचे कुटुंब आता त्रस्त झाले आहे. त्यामुळे आज कारखान्यासमोर आंदोलन छेडावे लागले आहे.

COMMENTS