देशात केवळ चार पुरोगाम्यांच्या हत्या झाल्याचे दाखवून त्यांचे भांडवल केले जात आहे – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

Homeताज्या बातम्यादेश

देशात केवळ चार पुरोगाम्यांच्या हत्या झाल्याचे दाखवून त्यांचे भांडवल केले जात आहे – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

वेब टीम : मुंबईसाम्यवादी विचारांच्या नक्षलवाद्यांकडून भारतात आतापर्यंत 14 हजार नागरिक, पोलीस, आमदार, मंत्री इत्यादींच्या निघृण हत्या करण्यात आलेल्या

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला बिगर खात्याचे मंत्री झेंडावंदनाला जाणार
पाथर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; ५७ लाखाचा गांजाचा अमली पदार्थ जप्त..
बेकायदेशीर वास्तव्य करणारा पाकिस्तानी तरुण अटकेत

वेब टीम : मुंबई
साम्यवादी विचारांच्या नक्षलवाद्यांकडून भारतात आतापर्यंत 14 हजार नागरिक, पोलीस, आमदार, मंत्री इत्यादींच्या निघृण हत्या करण्यात आलेल्या आहेत.
जगभरात कम्युनिस्टांनी 10 कोटींहून अधिक लोकांच्या हत्या केल्या आहेत. याविषयी कोणी काहीच बोलत नाही. म्हैसूर येथे आबिद पाशा टोळीने 8 हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या. त्याविषयी कोणी बोलत नाहीत; मात्र ज्या गौरी लंकेशला मृत्यूच्या आधी कोणी ओळखत नव्हते. जिने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, तसेच हिंदु धर्म यांविषयी अत्यंत आक्षेपार्ह लिखाण केले आहे; तिचे उदात्तीकरण केले जात आहे. जणू आपल्या देशात गांधींच्या हत्येनंतर केवळ चारच पुरोगाम्यांच्या हत्या झाल्या आहेत, असे दाखवून त्याचे भांडवल केले जात आहे. अन्य हत्यांविषयी हे पुरोगामी आवाज का उठवत नाहीत, असा प्रश्‍न हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गौरी लंकेश प्रकरण : वास्तव आणि विपर्यास’ या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

 या वेळी सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै यांनी सांगितले की, गौरी लंकेश यांचे नक्षलवाद्यांशी अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांनी काही नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास लावल्यामुळे गौरी लंकेश यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यांचा भाऊ इंद्रजित लंकेश यांनी त्यांच्या हत्येमागे नक्षलवादी असल्याची शक्यता वर्तवली होती; मात्र त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला नाही.

COMMENTS