तालिबानला भारताचा विरोध… यूएन सिक्योरिटी कौन्सिल रिझोल्युशन लागू करण्याची मागणी

Homeताज्या बातम्याराजकारण

तालिबानला भारताचा विरोध… यूएन सिक्योरिटी कौन्सिल रिझोल्युशन लागू करण्याची मागणी

प्रतिनिधी : दिल्लीतालिबानने अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर परिस्थिती गंभीर आहे. याचे पडसाद भारतावरही उमटण्याची शक्यता आहे. आता तालिबानचा उदय हा भा

महापुरूषांच्या अवमानाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा  
 तानाजी सावंत महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे – शरद कोळी 
राज्यात थंडीचा जोर पुन्हा ओसरला

प्रतिनिधी : दिल्ली
तालिबानने अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर परिस्थिती गंभीर आहे. याचे पडसाद भारतावरही उमटण्याची शक्यता आहे. आता तालिबानचा उदय हा भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे.

तालिबानने आता अफगाणिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करणाऱ्याची घोषणा केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांनी ऑस्ट्रेलियाचे सरंक्षणमंत्री पीटर डटन यांच्याशी तालिबान दहशतीविषयी बोलताना भारताविषयी चिंता व्यक्त केली आहे.

राजनाथ सिंग म्हणाले की, “तालिबान सध्या जगासमोर आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानमधील जमिनीचा वापर कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे अफगाणिस्तानवर युएन सेक्योरिटी काऊंसिल रिझॉल्युशन २५९३ लागू करण्यात यावे.”

COMMENTS