Homeमहाराष्ट्र

कुराडीने घाव घालून दोन कुत्र्यांना ठार मारले

लहान मुलास कुत्रे चावल्याच्या कारणावरून मुलाचा वडील व त्याच्या मित्राने सोमवारी सकाळी कुर्‍हाडीने घाव घालून दोन कुत्र्यांना ठार मारले.

राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार ः मुख्यमंत्री शिंदे
अजितदादांचा केज मतदारसंघावर कसा होणार प्रभाव
उदय सामंतावरील हल्ला प्रकरणात 6 जणांना पोलीस कोठडी.

इस्लामपूर / प्रतिनिधी : लहान मुलास कुत्रे चावल्याच्या कारणावरून मुलाचा वडील व त्याच्या मित्राने सोमवारी सकाळी कुर्‍हाडीने घाव घालून दोन कुत्र्यांना ठार मारले. आष्टा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 

याबाबत परसू बापू जाधव यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अमोल आनंदराव माळी व सागर डोंबाळे (दोघेही रा. आष्टा) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आष्टा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, येथील नदाफ कॉलनीतील परसू बापू जाधव यांच्या समाजाची कुत्री  पाळण्याची परंपरा असून त्यांनी दोन कुत्री पाळली आहेत. तेे दिवसभर कुत्र्यांना साखळीने बांधून ठेवतात व रात्री मोकळी सोडतात. सोमवाारी सकाळी नेहमीप्रमाणे दोन कुत्र्यांना साखळीने बांधून ठेवले होते. त्यापैकी एक कुत्रा साखळीतून निसटून पळून गेला व त्या कुत्र्याने त्यांच्या घराजवळ राहणारे अमोल आनंदराव माळी यांच्या लहान मुलास चावा घेतला. त्यामुळे जाधव यांनी पळून गेलेले कुत्रे पकडुन साखळीने बांधनु ठेवले. त्यानंतर थोड्याच वेळात अमोल माळी व त्याचा मित्र सागर डोंबाळे हे दोघेजण जाधव यांच्या घरी आले. सागर याच्या हातात फरशी कुर्‍हाड होती. यावेळी अमोल याने तुझ्या कुत्र्याने माझ्या मुलाला चावा घेतला आहे. तुझी कुत्री आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणून त्याने सागर यास बांधून ठेवलेल्या कुत्र्यांना ठार मारण्यास सांगितले. त्याप्रमाणे सागर याने दोन्ही कुत्र्यांना मानेवर कुर्‍हाडीने वार करून ठार मारले. त्यानंतर तेथून ते निघून गेले. या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS