Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजकोट किल्ल्यावर रविवारी जाणार ः मनोज जरांगे

जालना : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पुतळा कोसळल्यानंतर अनेक

सगेसोयऱ्यांची 2 दिवसांत अंमलबजावणी करा
सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर ठाम
आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी कुणाची ?

जालना : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पुतळा कोसळल्यानंतर अनेक नेत्यांनी राजकोटला भेटीही दिल्या. आता मी 1 सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर जोणार आहे, देवेंद्र फडणवीस मला अडवणार आहेत का? असे म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दंड थोपटले आहेत. जालन्यातून ते माध्यमांशी बोलत होते. मनोज जरांगे हे 1 सप्टेबरला राजकोट किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार आहेत.

COMMENTS