Homeताज्या बातम्या

विद्यार्थी आंदोलनात लाठीचार्जचा आदेश कोणी दिला? खासदार राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्राद्वारे सवाल

नवी दिल्ली: विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलकांवर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री

‘ऑपरेशन टायगर’शी भाजपचा संबंध नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचे आरोप फेटाळले
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा गुंडांना दणका; धोकादायक गुंड एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध
एकजुटीची ताकद दाखवा; ३० जूनच्या महामोर्चात सहभागी व्हा – पुरुषोत्तम (गोटू) वीर
छात्रों को मारने का आदेश किसने दिया? राहुल गांधी ने अमित शाह को लेटर लिख  पूछे तीखे सवाल, जवाबदेही तय करने की मांग - rahul gandhi letter to amit shah  sharp questions

नवी दिल्ली: विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलकांवर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. २० जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी मोर्च्यादरम्यान आंदोलकांना लक्ष्य करून छर्रे झाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेत १९ वर्षीय साहील लोचब या विद्यार्थ्याची दृष्टी गेल्याचा दावा करत, अशा कारवाईचा आदेश नेमका कोणी दिला होता, असा थेट सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.

पत्रात त्यांनी २० जुलैच्या कारवाईबाबत सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांवर हल्ला करणारे साध्या वेषातील व्यक्ती नेमके पोलीस होते की इतर कोणी, याचाही खुलासा सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी केली.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन संपुष्टात आले आहे. त्यानंतर आंदोलनाचे प्रतिनिधी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी पाच प्रमुख मागण्या सादर केल्या. या मागण्यांमध्ये परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या गुन्ह्यांना किमान दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा, दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद, स्वतंत्र राष्ट्रीय परीक्षा आयोगाची स्थापना आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता व स्वायत्तता सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला माध्यमांसमोर आणले. विद्यार्थ्याच्या हातावरील, पाठीवरील आणि छातीवरील जखमा दाखवत त्यांनी आंदोलकांवर अनावश्यक बळाचा वापर झाल्याचा आरोप केला. यावेळेस राहुल गांधी म्हणाले की, शांततेत तिरंगा हातात घेऊन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे कारवाई होणे लोकशाहीला शोभणारे नाही. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

COMMENTS