Homeताज्या बातम्या

काळू धबधब्यावर दोन ट्रेकर्सचा मृत्यू; पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याने दुर्दैवी घटना

पुणे: पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील प्रसिद्ध काळू धबधबा परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन ट्रेकर्सचा पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्यान

कर्जतला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठीच्या हालचालींना वेग; ऍड. शेवाळे यांची माहिती
तीन बिबट्यांची निघोज परिसरात दहशत; वनविभागाने त्वरित पिंजरे लावण्याची ग्रामस्थांची मागणी
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथील धक्कादायक घटना
काळू धबधबा ट्रेक | देवाची दरी | महाराष्ट्र गडकिल्ले

पुणे: पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील प्रसिद्ध काळू धबधबा परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन ट्रेकर्सचा पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी मृत ट्रेकर्सची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरापासून माळशेज घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काळू धबधब्यावरून मोठ्या वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू असून, धबधब्याखालील काळू नदीही दुथडी भरून वाहत आहे.

अशा गंभीर परिस्थितीत ट्रेकिंगसाठी आलेले रमण अण्णापुरे आणि पवन साठे हे दोघे पाण्याच्या प्रवाहात अडकले. पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की, दोघेही प्रवाहात वाहून गेले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

COMMENTS