पुणे: पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील प्रसिद्ध काळू धबधबा परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन ट्रेकर्सचा पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्यान

पुणे: पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील प्रसिद्ध काळू धबधबा परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन ट्रेकर्सचा पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी मृत ट्रेकर्सची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरापासून माळशेज घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काळू धबधब्यावरून मोठ्या वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू असून, धबधब्याखालील काळू नदीही दुथडी भरून वाहत आहे.
अशा गंभीर परिस्थितीत ट्रेकिंगसाठी आलेले रमण अण्णापुरे आणि पवन साठे हे दोघे पाण्याच्या प्रवाहात अडकले. पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की, दोघेही प्रवाहात वाहून गेले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

COMMENTS