Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलडाण्यातील 4 गावांचा मध्यप्रदेशात जाण्याचा इशारा

बुलडाणा : राज्यात कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेश सीमावाद प्रश्‍न उपस्थित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुलढाण्यातील 4 गावांनी मध्यप्रदेशात

निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा
 अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या दोन गटात अंधाधुंद गोळीबार
इंडिया आघाडीची वाट बिकट

बुलडाणा : राज्यात कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेश सीमावाद प्रश्‍न उपस्थित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुलढाण्यातील 4 गावांनी मध्यप्रदेशात समाविष्ट होण्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगितला आहे. तसेच, सोलापुरातही हक्क दाखवला आहे. दरम्यान, सोलापुरातील काही गावांनी राज्यसरकार कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. यापार्श्‍वभूमीवर बुलढाण्यातील 4 गावांनी मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवरील बुलढाण्यातील 4 गावातील नागरिकांनी मध्यप्रदेश जाण्याचा निर्णय घेतला आहे. मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप या गावकर्‍यांनी केला आहे. पाणीप्रश्‍न, आरोग्य सुविधा, शिक्षण अशा मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता मध्यप्रदेश सीमावादाला तोंड फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS