Homeताज्या बातम्या

महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरणजम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उरी परिसरात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आले. या घटनेमुळे राज्यभ

तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या
सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन


श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उरी परिसरात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आले. या घटनेमुळे राज्यभरात शोककळा पसरली असून दोन्ही जवानांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देशसेवेच्या कर्तव्यावर असताना प्राणांची आहुती देणार्‍या या जवानांना विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील उरी परिसरातील कमलकोट भागात मंगळवारी सायंकाळी स्फोटाची घटना घडली. या दुर्घटनेत भारतीय सैन्यातील दोन जवान गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सहकारी जवानांनी तातडीने बचावकार्य हाती घेत दोघांना श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र जखमा गंभीर असल्याने दोघांनाही वाचवता आले नाही. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. वीरमरण पावलेले एक जवान नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील रहिवासी होते, तर दुसरे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शाहपूर गावचे होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच दोन्ही गावांमध्ये शोकाचे वातावरण निर्माण झाले. नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि माजी सैनिकांनी त्यांच्या शौर्याला अभिवादन करत श्रद्धांजली वाहिली. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना स्फोटक हाताळणीदरम्यान घडलेल्या दुर्घटनेमुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी सैन्यदलाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी अहवालानंतर घटनेमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आवश्यक शासकीय आणि लष्करी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही वीर जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणार असून पूर्ण लष्करी सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणार्‍या या जवानांच्या शौर्याला संपूर्ण महाराष्ट्राने आदरपूर्वक सलाम केला आहे.

COMMENTS