Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवी मुंबई विमानतळचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई प्रतिनिधी - राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. यावेळी त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधांवर जोर दिला. राज्

अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दारी करून शपथ घेतली त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही ?
देशाला मोदींशिवाय पर्याय नाही
आमच्यात फाटले, उगीच शंका ठेवू नका

मुंबई प्रतिनिधी – राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. यावेळी त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधांवर जोर दिला. राज्यात रेल्वेचा विकास वेगाने सुरु आहे. राज्यात ६ वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत. रेल्वे प्रकल्पासाठी १५ हजार कोटींची भरीव तरतूद केंद्रीय अर्थ संकल्पात करण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. राज्यात रस्ते, बंदरे, विमानतळ, वीज प्रकल्पाचे कामे सुरु आहेत. २०४७ पर्यंत भारताला विकसित देश करण्यासाठी विकास धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. पायाभूत सुविधांवर १ रुपये खर्च केला तर स्थूल भांडवलात तीन ते साडेतीन रुपयांची वाढ होत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

COMMENTS