Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 संजय राऊत रिकाम टेकडा माणूस; सुषमा अंधारेंनी मर्यादा पाळल्या पाहिजेत – निलेश राणे  

बीड प्रतिनिधी - सुषमा अंधारे ज्या तऱ्हेने बोलतात जसं की त्या दोन-तीन टर्म निवडणुका लढल्या आहेत. कधी मंत्री होत्या का? त्यामुळे नेमका हा कॉन्फ

छोटे-मोठे साहेब हजर…पण कार्यालयाचे काम मात्र पूर्ण बंद
पुण्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर!
जपानमध्ये पुन्हा 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप

बीड प्रतिनिधी – सुषमा अंधारे ज्या तऱ्हेने बोलतात जसं की त्या दोन-तीन टर्म निवडणुका लढल्या आहेत. कधी मंत्री होत्या का? त्यामुळे नेमका हा कॉन्फिडन्स त्यांच्यात कुठून आला? हेच कळत नसल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. केज न्यायालयात 2020 मधील प्रकरणाच्या सुनावणीसाठी राणे आज केज न्यायालयात हजर झाले होते. अंधारे एकदा ही निवडणूक लढल्या नाहीत. माझ्यापेक्षा तुम्ही तीन वर्षांनी त्या आहात आहेत. भाषा वापरतात त्यावर मर्यादा आल्या पाहिजे. अंधारे ताईंनी देखील मर्यादा पाळल्या पाहिजे त्यामुळे तुमचा अधिकार काय? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर बोलता कोणत्या अधिकाराने तुम्ही बोलता, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. संजय राऊत रिकामटेकडे आहेत. त्यांना दुसरे काहीच काम नाही. महाराष्ट्रात त्यांची किंमत काय? पत्रा चाळचा तो आरोपी आहे. संजय राऊत याचा काय संबंध असे म्हणत निलेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

COMMENTS