Homeताज्या बातम्यादेश

राजस्थानला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन

जयपूर/वृत्तसंस्था ः राजस्थानची पहिली वंदे भारत ट्रेन सकाळी 11.30 वाजता जयपूरहून दिल्ली कॅन्टसाठी रवाना झाली. या सेमी हायस्पीड ट्रेनला पंतप्रधान न

वंदे भारत ट्रेनमध्ये ओढली विडी
पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळीच वंदे भारत ट्रेनवर दगडफेक
अयोध्या-दिल्लीसाठी वंदे भारत ट्रेन सुरू

जयपूर/वृत्तसंस्था ः राजस्थानची पहिली वंदे भारत ट्रेन सकाळी 11.30 वाजता जयपूरहून दिल्ली कॅन्टसाठी रवाना झाली. या सेमी हायस्पीड ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. देशातील 15 व्या वंदे भारतच्या नियमित फेर्‍या 13 एप्रिलपासून अजमेर ते दिल्ली कँट दरम्यान होणार आहेत. यासाठी आयआरसीटीसीने आजपासून बुकिंग सुरू केले आहे.
वंदे भारतच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात मोदींनी आधीच्या सरकारांवर रेल्वेबाबत राजकारण केल्याचा आरोप केला. मोदी म्हणाले की, जनतेला स्थिर सरकार मिळाल्यानंतर रेल्वेत झपाट्याने बदल सुरू झाले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना चिमटा काढत मोदी म्हणाले की, आजकाल ते राजकीय संकटात आहेत, राजकीय संकटातून जात आहेत, तरीही वेळात वेळ काढून कार्यक्रमाला पोहोचले आहेत. वंदे भारत ट्रेनने जयपूर आणि दिल्लीला जाणे सोपे होईल, असे पंतप्रधान म्हणाले. या ट्रेनमुळे राजस्थानच्या पर्यटनालाही मदत होणार आहे. पुष्कर आणि अजमेर शरीफ या श्रद्धेच्या ठिकाणी पोहोचणे लोकांना सोपे होणार आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही सहावी वंदे भारत ट्रेन आहे. कधी आणि कोणती ट्रेन धावणार हे आधी राजकीय हितसंबंधानुसार ठरवायचे, असे मोदी म्हणाले. कोण रेल्वे मंत्री होणार? रेल्वे भरतीतही भ्रष्टाचार व्हायचा, अशी स्थिती होती. गोरगरिबांच्या जमिनी हिसकावून त्यांना नोकर्‍यांचे आमीश दाखवण्यात आले. सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाले, परंतु देशातील जनतेने स्थिर सरकार स्थापन केल्यावर परिस्थिती बदलली. राजकीय दबाव दूर झाल्यावर रेल्वेचीही त्यातून सुटका झाली आहे. आज प्रत्येक भारतीयाला रेल्वेची नवसंजीवनी पाहून अभिमान वाटतो. जलद गतीपासून ते सुंदर डिझाइनपर्यंत वंदे भारत आकर्षक ठरत आहे, असे ही पंतप्रधान म्हणाले. या ट्रेनचे देशभरातून कौतुक होत आहे. वंदे भारतने अनेक नवीन सुरुवात केली आहे. वंदे भारत ही पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे, जी मेड इन इंडिया आहे. ही कॉम्पॅक्ट आणि कार्यक्षम आहे, स्वदेशी सुरक्षा प्रणालींनी सुसज्ज आहे. आज ही ट्रेन भारताला एका विकसित प्रवासाकडे घेऊन जाईल. रेल्वेसारख्या महत्त्वाच्या यंत्रणेलाही राजकारणाचा आखाडा बनवण्यात आला, हे आपल्या देशाचे दुर्दैव होते. स्वातंत्र्यानंतर भारताला रेल्वेचे मोठे जाळे मिळाले होते, पण त्यावर राजकीय हितसंबंधांचे वर्चस्व होते. आधुनिक गाड्या सुरू झाल्यापासून आतापर्यंत 60 लाख लोकांनी या गाड्यांमधून प्रवास केला आहे. हायस्पीड वंदे भारतचे वैशिष्ट्य म्हणजे यामुळे वेळेची बचत होत आहे. देशभरात धावणार्‍या वंदे भारत ट्रेनने लोकांचे 2500 तास वाचवले आहेत. हे तास लोक इतर कामांसाठी वापरत आहेत.

COMMENTS