Homeताज्या बातम्या

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज; विविध जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी

मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जो

‘आयबी’साठी शिर्डीऐवजी निमगाव कोऱ्हाळे येथे जागा; राज्य शासनाचा मोठा निर्णय
सोनाल पाटील यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड
शिक्षणातील भ्रष्टाचाराविरोधात शेवगावमध्ये रास्तारोको; दिल्लीतील आंदोलनास नागरिकांचा जाहीर पाठिंबा
140,800+ Rain Forecast Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock

मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता विविध जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज सोमवार ०३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. उद्या मंगळवार ०४ ऑगस्ट रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बुधवार ०५ ऑगस्ट रोजी बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी आश्रयाला जावे तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

COMMENTS