नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि दरडी क

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला, तर अन्य सहा जण बेपत्ता आहेत. सरकारने ६५ मदत छावण्या उभारल्या असून, तिथे १,४६५ लोकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.
कर्टकातील शिवमोग्गा जिल्ह्यात रविवारी सकाळी दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मल्लिकार्जुन (३५), त्यांची पत्नी नागवेणी (२८) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा संतोष यांचा समावेश आहे. ही घटना घडली तेव्हा हे तिघेही डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या घरात झोपलेले होते.

COMMENTS