Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यात्रेनिमित्त जोतिबा डोंगर गुलालाने न्हाऊन निघाला

कोल्हापूर : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या कोल्हापूरच्या जोतिबाच्या दर्शनाला मंगळवारी चैत्र पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली होती. . चां

आजच्या राजकारण्यांची शाहू महाराजांचा आदर्श घ्यावा
निलंगा, औराद आणि देवणी बाजार समितीवर भाजपाची एकहाती सत्ता
‘व्यंकटेशा’! कुठं फेडशील हे पाप !

कोल्हापूर : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या कोल्हापूरच्या जोतिबाच्या दर्शनाला मंगळवारी चैत्र पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली होती. . चांगभलंच्या गजरात आणि गुलालाची मुक्त उधळण करत मानाच्या सासनकाठ्या दाखल होत आहेत. तीन दिवस चालणार्‍या चैत्र यात्रेचा मंगळवारी  मुख्य दिवस असून जोतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला.
केवळ महाराष्ट्रातून नाही, तर दक्षिण भारतातून सुमारे सात ते आठ लाख भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. मानाच्या सासनकाठीचं पूजन झाल्यानंतर संध्याकाळी पालखी सोहळा पार पडणार आहे. यंदा पाऊसमान चांगला व्हावा, रोगराई येऊ नये, असे साकडे भाविकांनी जोतिबाला घातलं. महाराष्ट्र, कर्नाटकासह बाजूच्या राज्यांतून भाविक कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आतापर्यंत तब्बल आठ लाख भाविक जोतिबा डोंगरावर उपस्थित झाले आहेत. यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केली होती. जोतिबा चैत्र यात्रेला वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या सासनकाठ्या हे यात्रेचे एक प्रमुख आकर्षण असते. या मिरवणुकीमध्ये 20 फुटांपासून ते 70 ते 80 फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. सासनकाठी खांद्यावर घेऊन नाचणे, तोरण्या सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते. अनेकजण आपापल्य भागातील सासनकाठ्या घेऊन जोतिबा यात्रेस बहुतांश पायी चालतच येतात. यात्रेत येणार्‍या असंख्य सासनकाठ्यांपैकी 108 काठ्या मानाच्या असून त्यांना देवस्थान समितीच्या वतीने क्रमानुसार मानपान दिला जातो. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान पाडळी (जि.सातारा), त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल) या सासनकाठ्यांना विशेष मान दिला जातो.

COMMENTS