Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात मुस्लीम असुरक्षित; आमदार अबू आझमी यांची विधानसभेत सरकारवर जोरदार टीका

https://youtu.be/fUx5KhxGpnk?si=g7XRNFoNOgpB71HZ समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी महाराष्ट्र विधानसभेत राज्यातील मुस्लीम समाजाच्या

सदगुरुंच्या नामस्मरणात प्रचंड सामर्थ्य श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन
सातारा पालकमंत्र्यांच्या हस्ते आज मिळणार अनुकंप कोट्यातून उमेदवारांना नियुक्त आदेश
अर्बन बँकेच्या सोनेतारणात घोळ… ३० पिशव्यांमध्ये सापडले बेन्टेक्सचे दागिनेl पहा LokNews24

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी महाराष्ट्र विधानसभेत राज्यातील मुस्लीम समाजाच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून सरकारवर अत्यंत कडाडून टीका केली आहे. राज्यातील मुस्लीम समाज सध्या भीती आणि असुरक्षिततेच्या सावटाखाली असल्याचे त्यांनी नमूद केले. वाढत्या जातीय तणावाच्या घटनांकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

भाजपचे आमदार नितेश राणे आणि इतर काही नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रक्षोभक भाषणांवर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. “दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर सरकार कारवाई का करत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अलीकडच्या काळात काही ठिकाणी मशिदींना लक्ष्य करण्यात आले किंवा धार्मिक मिरवणुकीवेळी वाद निर्माण झाले, यावर त्यांनी संताप व्यक्त केला.

पोलीस प्रशासन आणि सरकार एका विशिष्ट विचारधारेला पाठीशी घालत असून, अल्पसंख्याक समाजाला डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

COMMENTS