Homeताज्या बातम्यादेश

‘मन की बात’ तीन महिन्यांसाठी स्थगित

नवी दिल्ली ः दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणारा ‘मन की बात’ कार्यक्रम पुढील तीन महिने प्रसारित होणार नसल्याची माहिती पंतप्रधान नरेंद

राज्य फेडरेशनची क्रॉस प्रणाली वापरल्याशिवाय कर्ज वितरण करू नये
कुस्तीपटू आणि पोलीसांमध्ये धक्काबुक्की
शासनाच्या योजनांमागे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांची प्रेरणा; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली ः दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणारा ‘मन की बात’ कार्यक्रम पुढील तीन महिने प्रसारित होणार नसल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लागू होणार्‍या आचारसंहितेमुळे या कार्यक्रमाचे प्रसारण तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात येईल. एप्रिल-मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळे मार्चपासून आचारसंहिता लागू होईल. याबाबतची घोषणा निवडणूक आयोग पुढील महिन्यात करण्याची शक्यता आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. यानिमित्ताने त्यांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार्‍या युवा वर्गाला मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

COMMENTS