मुंबई : २००६ सालचा तो काळजाचा ठोका चुकवणारा मालेगाव बॉम्बस्फोट… ज्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आता या प्रकरणातील सर्व चार प्रमुख आरोपींना म

मुंबई : २००६ सालचा तो काळजाचा ठोका चुकवणारा मालेगाव बॉम्बस्फोट… ज्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आता या प्रकरणातील सर्व चार प्रमुख आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नरवारिया… या चौघांवरील दोषारोप निश्चित करणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश हायकोर्टाने रद्द केला आहे. तांत्रिक दृष्ट्या हे आरोप टिकत नसल्याचं सांगत न्यायालयाने ही खटल्याची प्रक्रियाच संपुष्टात आणली आहे.
मशिदीजवळ झालेल्या या साखळी स्फोटात ३७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. यापूर्वी ११ जणांची निर्दोष मुक्तता झाली होती, आणि आता उरलेल्या चारही आरोपींवरील आरोपपत्र रद्द झाल्याने एक मोठी कायदेशीर लढाई तूर्तास थांबली आहे.
पण खरा प्रश्न अजूनही शिल्लक आहे! जर सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असेल, तर मग ३७ जणांचा जीव घेणारा तो स्फोट नेमका घडवला कुणी? एनआयए आता या निकालावर वरच्या न्यायालयात दाद मागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS