Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वादळी पावसामुळे आंब्याचे नुकसान

जळकोट प्रतिनिधी - भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जळकोट तालुक्यात दि 14 एप्रिलच्या संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी वा-यासह पा

एमएमआर क्षेत्र आणि पुण्याच्या विकासाला मोठा बुस्टर – मुख्यमंत्री फडणवीस
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी होणार – कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
महायुतीचा ‘राजकीय चेकमेट’; अमरनाथ राजुरकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब, विरोधकांची सर्व गणिते कोलमडलीआपकी बार 400 पार …

जळकोट प्रतिनिधी – भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जळकोट तालुक्यात दि 14 एप्रिलच्या संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी वा-यासह पाऊस झाला यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . तसेच डोंगरगाव येथे शेतात बांधलेल्या म्हशीवर वीज पडून म्हशीचा जागीच मृत्यू झाला. जळकोट तालुक्यात झालेल्या वादळी वा-यामुळे तालुक्यातील आतनूर व शिवारात शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा व पाऊस होऊन केशर आंब्याचे झाडे मोडून पडले असून आंब्याचे खूप नुकसान झाले आहे. यासोबत हळद वाढवणा परिसरामध्ये देखील सोसाट्याचा वारा सुटला. जळकोट मधील सुनील अवलवार यांच्या शेतातील देखील आंब्याचे नुकसान झाले. यासोबतच डोंगरगाव परिसरात वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला यामध्ये सुरज खंबाळे यांची म्हैस शेतामध्ये झाडाखाली बांधली होती. रात्रीच्या सुमारास वीज म्हशीच्या अंगावर पडली व म्हशीचा जागीच मृत्यू झाला यामुळे सदरील शेतक-याचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे . सदरील शेतक-याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महेश सातापुरे यांनी केली आहे.

COMMENTS