Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिहे कठापूरचा समावेश पीएमकेएसवायमध्ये व्हावा; आ. जयकुमार गोरे यांची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी

दिल्ली : केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्याबरोबर जिहे कठापूर योजनेसाठी नाबार्डमधून निधी मिळण्यासंदर्भात चर्चा करताना खा. निंबाळकर, आ. गोरे व मान्यवर.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तक्रारींबाबत विमा कंपन्यांशी चर्चा करू – कृषीमंत्री दादाजी भुसे
स्वच्छता अभियानांतर्गत आंब्रळ टेबललँड पठारावर स्वच्छता मोहीम
बेलवडे विकास सेवा सोसायटी निवडणूकीत सत्तांतर
दिल्ली : केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्याबरोबर जिहे कठापूर योजनेसाठी नाबार्डमधून निधी मिळण्यासंदर्भात चर्चा करताना खा. निंबाळकर, आ. गोरे व मान्यवर.

औंध / वार्ताहर : स्व. लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर जलसिंचन योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करावा, अशी मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांनी केली. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला तसे पत्रही त्यांनी दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भागवत कराड यांना भेटून योजना संपूर्ण पूर्णत्वाला जाण्यासाठी लागणारा निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी केली.
नवी दिल्ली येथे खा. निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांनी जिहे-कठापूर योजनेच्या अनुषंगाने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयासह विविध मंत्र्यांची भेट घेतली. मंत्री गजेंदरसिंह शेखावत यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे कि 3.17 टीएमसी पाणी उचलून माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यातील 67 गावांमधील 2700 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार्‍या जिहे कठापूर योजनेसाठी जानेवारी 21 पर्यंत 587.88 कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. बॅरेज आणि रायझिंग मेन्सची कामे झाली आहेत. सन 2021 मध्ये योजनेचा पहिला टप्पा सुरु करुन 7900 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. उरलेले 19 हजार 600 हेक्टर क्षेत्र आगामी तीन वर्षात ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून अपेक्षित निधी मिळत नाही. प्रकल्पाचे संपूर्ण काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेतून लागणारा सर्व निधी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी या प्रकल्पाचा समावेश पीएमकेएसवायमध्ये त्वरित करावा, अशी मागणी जलशक्ती मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
खा. निंबाळकर आणि आ. गोरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जिहे-कठापूर योजनेला निधी मिळवून देण्याबाबत विनंती केली. याविषयी बोलताना आ. जयकुमार गोरे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिहे कठापूरच्या वाढीव खर्चाला दोन वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने ही योजना मार्गी लागत आहे. आता प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत जिहे कठापूरचा समावेश होवून लागणारा उर्वरित निधी केंद्राकडून उपलब्ध होणार आहे. नाबार्डमधून आणखी निधी मिळण्यासाठी मंत्री भागवत कराड यांच्याबरोबरही चर्चा केली आहे. निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

COMMENTS