Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर जिल्ह्यात एक रुपया विमा हप्ता भरुन पाच लाख शेतकर्‍यांनी काढला पीक विमा!

लातूर प्रतिनिधी - राज्य शासनाने शेतक-यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरुन आपल्या खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसा

पावसाअभावी पिके कोमेजल्याने शेतकरी चिंतेत
डॉ. तेजस शेंडे यांना पीएचडी पदवी प्रदान
चोपडा तालुक्यात झालेल्या वादळामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकरी हवालदिल

लातूर प्रतिनिधी – राज्य शासनाने शेतक-यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरुन आपल्या खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार 118 जुलैपर्यंत लातूर जिल्ह्यातील 5 लाख 889 शेतक-यांनी एक रुपया विमा हप्ता भरुन या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या पीक नुकसानीची भरपाई मिळू शकेल.
कर्जदारकिंवा बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतक-यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आपल्या पिकाचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेचा विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेणारीकिंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान पीक विम्यासाठी पात्र आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा घेण्यासाठी इच्छुक कर्ज न घेतलेल्या शेतक-यांनी जवळच्या बँक शाखेत, जनसेवा केंद्र (सीएससी), विमा कंपनीकिंवा अधिकृत एजंट यांच्यामार्फत ऑनलाईन अर्ज करता येईल.

COMMENTS