नवी दिल्ली : हैदराबादहून हुबळीच्या दिशेने निघालेले एक प्रवासी विमान खराब हवामानामुळे नियोजित ठिकाणी उतरू शकले नाही. सुरक्षिततेचा विचार करून अखेरी

नवी दिल्ली : हैदराबादहून हुबळीच्या दिशेने निघालेले एक प्रवासी विमान खराब हवामानामुळे नियोजित ठिकाणी उतरू शकले नाही. सुरक्षिततेचा विचार करून अखेरीस ते विमान बेंगळुरूकडे वळवण्यात आले. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व 22 प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रतिकूल हवामानामुळे विमानाला हुबळी परिसरात उतरता आले नाही. हवामान सुधारण्याची शक्यता लक्षात घेऊन विमानाने काही काळ परिसरातच घिरट्या घातल्या. सुमारे तीन तास विमान हवेतच राहिल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

COMMENTS