Homeताज्या बातम्यादेश

नवरी पळून गेल्याने नवऱ्याचे आंदोलन

राजस्थान प्रतिनिधी - शादी का लड्डू… खावासा तर सगळ्यांनाच वाटतो, पण ते सगळ्यांनाच पचतं असं नाही. राजस्थानमध्ये अशी एक धक्कादायक घटना उघडकीस

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी विष्णू देव साय
शिष्यवृत्ती परीक्षेत सातारच्या ’पोदार इंटरनॅशनल स्कूलचा निरंजन तोरडमल महाराष्ट्रात प्रथम
मार्केट यार्डात तीन दिवसीय आंबा महोत्सवात सुरुवात 

राजस्थान प्रतिनिधी – शादी का लड्डू… खावासा तर सगळ्यांनाच वाटतो, पण ते सगळ्यांनाच पचतं असं नाही. राजस्थानमध्ये अशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिच्याशी लग्न करण्यासाठी वरात घेऊन नवरदेव १३ दिवस आंदोलन करत होता, तीच त्याच्या जन्माची साथीदार त्याला सोडून पळून गेल्याने मोठा धक्का बसला आहे. विवाहीत मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने माहेरची लोकही हादरले आहेत. तिचा सगळीकडे शोध घेतला, पण सापडली तर ती कुठेच नाही. याप्रकरणी पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली आहे. राजस्थानच्या पालीमध्ये हा अजब प्रकार घडला आहे. तेथील सेणा गावातील एक तरूणींच लग्न ठरलं होतं, मात्र सप्तपदीपूर्वीच ती पळाली होती. ते पाहून तिचा होणारा नवरा आणि सासरच थेट उपोषणालाच बसले. तब्बल १३ दिवस ते तिच्या घरासमोर ठिय्या देऊन बसले. अखेर ती परत आली, लग्नही झालं, सगळेच आनंदी होते. पण मध्येच काय झालं काय माहीत, ती विवाहीत मुलगी माहेरी आली आणि तिथून पुन्हा पळून गेली. 3 मे रोजी सेना गावातील या मुलीचा विवाह ठरला होता. सगळी तयारी झाल्यानंतर लग्न लागणारचं होतं, तेवढ्यात नवरी प्रियकरासह पळून गेली. वधू निघून गेल्यानंतर वराकडचे संतापले आणि त्यांनी वधूच्या कुटुंबीयांकडे तिला शोधून परत आणण्याची मागणी केली. ते थेट वधूच्या घराबाहेर आंदोलनासाठीच बसले. वऱ्हाडी 13 दिवस तिथेच तळ ठोकून बसल्याने वधू अखेर परत आली आणि लग्न केलं. पण लग्नानंतर माहेर आल्यावर पुन्हा पळून गेली.

COMMENTS