Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार सत्यजीत तांबेकडून घरवापसीचे संकेत

काँगे्रसमधील काही नेत्यांनी पक्षाबाहेर काढल्याचा आरोप

पुणे/प्रतिनिधी ः नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे काँगे्रस पक्षातून निलंबित करण्यात आलेले आणि अपक्

धर्माने कोणतेही राष्ट्र महासत्ता होणे नाही !
अमिताभ बच्चन शुटिंग दरम्यान जखमी
शहरातील एलआयसीच्या 68 इमारती धोकादायक!

पुणे/प्रतिनिधी ः नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे काँगे्रस पक्षातून निलंबित करण्यात आलेले आणि अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार सत्यजीत तांबे यांनी घरवापसीचे संकेत दिले आहेत. तांबे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना काँग्रेस पक्षात पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या विचारांमध्ये आणि रक्तामध्ये काँगे्रस असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.
तसेच पक्षातील काही लोकांनी मला पक्षाच्या बाहेर काढले? असा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये ते झारीतील शुक्राचार्य आहेत तरी कोण? ही चर्चा सुरु झाली. काँग्रेसमधील काही ठरविक लोकांनी टर्गेट करुन मला पक्षाच्या बाहेर ढकलले आहे. परंतु आमच्या रक्तात काँग्रेस आहे. आमच्या विचारात काँग्रेस आहे. शंभर वर्षांपासून आम्ही काँग्रेससोबत जोडले गेले आहोत. मला काही लोकांनी बाहेर ढकलले असेल तर ती पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की, माझ्यासारख्या लोकांशी संवाद साधला पाहिजे, असे देखील यावेळी तांबे यांनी म्हटले आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत माझ्यासंदर्भात कसे राजकारण झाले हे आपल्या सर्वांसमोर आहे. मी एकटाच नाही तर या देशात काँग्रेसमध्ये असणारे अनेक जण असे आहेत, ज्यांना टार्गेट केले जात आहेत. यावर पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे आहे. सध्याच्या राजकारणाची पातळी खालवली आहे. यामुळे नवीन राजकारण सुरु करण्याची गरज आहे. त्यासाठी युवकांनी राजकारण यावे, अशी अपेक्षा आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली. आमदार सत्यजित तांबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावर बोलण्यास नकार दिला. परंतु शरद पवार यांचे कौतूक केले. ते म्हणाले की, आपण लहानपणापासून वाचत आलो की शरद पवार हे जगातील सर्वात श्रीमंत राजकारणी आहेत. श्रीमंत राजकारणी म्हणजे काय तर एका रात्रीत पैसा उभा करू शकतात. चांगल्या लोकांना उभे करू शकतात. टाटा, बिर्ला, अंबानी यांना आणू शकतात. ही मसल पावर त्यांच्याकडे 50 वर्षातील राजकारणामुळे आली आहे. विलासराव देशमुख कायम म्हणायचे की राजकारण करताना सगळ्या प्रकारची लोकं आवश्यक असतात.

पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेण्याची गरज – आमदार तांबे यांना तुमची काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा आहे का? असे विचारले असता, तांबे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात जो एपिसोड झाला तो सगळ्यांच्या समोर आहे आणि कशा पद्धतीने राजकारण माझ्याबरोबर झाल हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्यासारखे अनेक चांगले काम करणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांना ठराविक नेत्यांकडून बाहेर ढकलण्यात आले आहे. ही चिंतेची बाब आहे यावर पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे आहे, असे तांबे यांनी सांगितले.

COMMENTS