Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबादेत दोन चारचाकी वाहनांचा अपघातात चार जणांचा मृत्यू  

औरंगाबाद प्रतिनिधी : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील कायगावजवळील गोदावरी शाळेच्या समोर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोन कारचा भीषण अप

औषधी घेऊन जाणारा ट्रक आणि कार मध्ये समोरासमोर धडक ; ट्रक झाला पलटी.
भाळवणीजवळील अपघातात सहा जणांचा मृत्यू
मोहटादेवीचे दर्शन घेऊन परतणारे 2 भाविक जागीच ठार

औरंगाबाद प्रतिनिधी : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील कायगावजवळील गोदावरी शाळेच्या समोर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चौघे जण ठार, तर पाच जण जखमी झाले आहेत. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पहिली गाडी दुभाजक ओलांडून दुसर्‍या गाडीला जाऊन धडकल्याने अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेले चौघेही औरंगाबादच्या वाळूज भागातील बजाजनगर येथील व्यावसायिक होते. मृतांमध्ये रावसाहेब मोटे (56), सुधीर पाटील (45), रतन बेडवाल (38), भवसिंग गिरासे (38) यांचा समावेश आहे. तसेच अन्य पाच जण जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरहून औरंगाबादच्या दिशेने जाणार्‍या स्विफ्ट गाडीच्या (एमएच 20 सीएस 5982) चालकाला कायगावजवळ वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची भरधाव कार दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने गेली. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणार्‍या वॅगनार गाडीला (एमएच 27 बीझेड 3889) जाऊन स्विफ्ट गाडी धडकली. ज्यात स्विफ्टमध्ये असलेले चौघे जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त गाडीचे दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढले आणि गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमी झालेल्या चौघांनाही डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. चौघेही मित्र असून प्लॉटिंगचा व्यवसाय करीत होते. तर चौघेही एका व्यवहारासंदर्भात नगरला गेले होते. दरम्यान परतताना प्रवरा संगम येथे जेवण करून बजाज नगर येथे घरी जात असताना अपघात झाला. दरम्यान समोरील वॅगनार गाडीतील पाच जण जखमी आहेत. ज्यात शशिकला कोराट (70), सिद्धार्थ जंगले (14), हेमंत जंगले (55), छाया जंगले (35), शकुंतला जंगले (70) यांचा समावेश आहे. या पाचही जणांना रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वॅगनार गाडीमधील प्रवासी अमरावतीहून देवगड येथे देव दर्शनासाठी जात होते.

COMMENTS