Homeताज्या बातम्यादेश

बिहारमध्ये पाच मुलांचा बुडून मृत्यू

औरंगाबाद: बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रक्षाबंधन करुन पोहायला गेलेल्या पाच भावंडाचा दुर्देवी मृत्यू

सेवानिवृत्त मुख्याध्यापक उस्मान खान पठाण यांचे निधनसायं.दैनिक बीड किसान चे कार्यकारी संपादक अदनान खान यांना पितृशोक
शिष्यवृत्ती परीक्षेत प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे यश
सीमाप्रश्‍नाचा लढा !

औरंगाबाद: बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रक्षाबंधन करुन पोहायला गेलेल्या पाच भावंडाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना सोनारचक गावात उघडकीस आली. ही पाचही मुले राखी बांधून झाल्यानंतर पोहायला गेली असता ही ह्रदयद्रावक घटना घडली. गावातील अनुज यादव यांचा मुलगा शुभम उर्फ गोलू कुमार (वय, 11), नीरज कुमार (2 वर्ष), धीरज कुमार (वय, 10 वर्ष), प्रिन्स कुमार (वय, 12), अमित कुमार (वय, 12) आणि अमित कुमार अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

COMMENTS