Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर वंचितचा मविआत समावेश

काँग्रेस-ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे एकमत

मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीकडून जागा वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात असून, त्यासंदर्भात बोलणी करण्यासाठी मंगळवार

सोयीचे राजकारण
महीलांनो घाबरु नका.. आपल्या सोबत जनसेवा फौंडेशन कायम सोबत आहे : सौ. शालिनीताई विखे पाटील
डोशातील चटणीला आक्षेप घेतल्याने मारहाण..तिघांना सक्तमजुरी

मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीकडून जागा वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात असून, त्यासंदर्भात बोलणी करण्यासाठी मंगळवारी महाविकास आघाडीच्या बैठक घेण्यात आली. या बैठकीचे वंचित आघाडीला देखील निमत्रंण देण्यात आले होते. त्यानुसार या बैठकीला वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित नसले तरी त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर वंचितला महाविकास आघाडीत सामावून घेत असल्याचे काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रससह, ठाकरे गटांच्या नेत्यांनी म्हटले आहे. मात्र महाविकास आघाडीचा प्रस्ताव अ‍ॅड. आंबेडकरांनी स्वीकारला का, याविषयी संदिग्धता असून, त्यासंदर्भात त्यांचे कोणतेही वक्तव्य अजून समोर आलेले नाही. त्यामुळे आंबेडकर काय म्हणतात, यावर पुढील राजकीय गणिते ठरणार आहे.

देशात सत्ताधार्‍यांविरोधात मोट बांधण्याकरता अनेक लहान-मोठ्या पक्षांना आघाडीत सामील करून घेतले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सामील होण्याकरता वंचित बहुजन आघाडीकडून इच्छा व्यक्त केली जात होती. भाजपविरोधात आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे वंचितचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे म्हणणे होते. परंतु, महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांबरोबर वंचितचे असलेले राजकीय मतभेद पाहता हे गणित जुळून येणे कठीण होते. परंतु, मंगळवारी  वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेतले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भातील पोस्ट एक्सवर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याकरता महाविकास आघाडीकडून आज नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण देण्यात आलं. त्यानुसार, वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी घटकपक्ष असल्याचे अधिकृत पत्र द्यावे अशी मागणी धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती. त्यानुसार, ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या सह्यानिशी महाविकास आघाडीच्या पत्रावर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात आल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. 2024 साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

2 फेबु्रवारीला महाविकास आघाडीची बैठक – महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे, असे या पत्राद्वारे जाहीर करण्यात आले आहे. तसेच, याबाबत संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करून 2 फेब्रुवारी रोजी होणार्‍या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी पक्ष सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वंचितमुळे देशातील हुकूमशाहीविरोधातील लढ्याला बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल, असेही संजय राऊत म्हणाले.

COMMENTS