Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाल हत्याकांडातील गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप

कोल्हापूर / प्रतिनिधी : देशालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट 25 वर्षांपूर्वी बालकांच्या अपहरणानंतर त्यांची हत्या करणार्‍या मायलेकींना ठोठावलेली फाश

साखराळे युनिटमध्ये प्रतिदिन दीड लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणार : आ. जयंत पाटील
शेअर मार्केटिंग साठी तालुक्यात एजंटाचा सुळसुळाट : वर्षात डबल करून देणारे आज गायब
युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी चेअरमन पी. एन. जोशी यांचे निधन

कोल्हापूर / प्रतिनिधी : देशालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट 25 वर्षांपूर्वी बालकांच्या अपहरणानंतर त्यांची हत्या करणार्‍या मायलेकींना ठोठावलेली फाशी उच्च न्यायालयाने रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सीमा आणि रेणूकाच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर राष्ट्रपतींनी ही त्यांचा दयेचा अर्ज सात वर्षांपूर्वी फेटाळल्यानंतरही शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही. तसेच गेली 25 वर्षे कारावासात त्या दोघांना डांबले, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल याचे खंडपीठाने या दोघींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर येथील अंजनाबाई गावित तिच्या दोन मुली सीमा आणि रेणूका या दोघींच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. दरम्यान गेल्या सात वर्षापूर्वी राष्ट्रपतींनी ही त्यांचा दयेचा अर्ज फेटाळला होता. फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर फासावर चढवण्यास सरकारला अपयश आले. याचा फायदा घेत या दोघींनी उच्च न्यायालयात फाशीची शिक्षा रद्द करावी, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेला राज्य सरकारने विरोध केला होता. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल याचे खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने राखून ठेवलेला निर्णय जाहीर करताना आरोपींची याचिका मंजूर करून फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्य सन 1990 ते 1996 बालकांच्या होणार्‍या अपहरणांमुळे हादरून गेला होता. मुळची नाशिकची असलेल्या अंजनाबाई गावित आणि तिच्या या मुलींनी ही अपहरणे घडवून आणली होती. सुरूवातीला अजंनाबाईचे एका ट्रक डायव्हरवर प्रमे होते. त्याच्याशी विवाह करून तिने नाशिक सोडले. या डायव्हरपासून तिला एक मुलगी झाली. त्यानंतर अंजनीला डायव्हरने सोडून दिले. मुलीच्या सांभाळ करण्यासाठी ती लहान मोठी कामे करून आपला संसार सांभाळत होती. त्यात तिचे एका रिटायर्ड सैनिकाबरोबर सुत जूळले. त्यादरम्यान अंजना हिला दुसरी मुलगी झाली. तिचा हाही विवाह फार काळ टिकला नाही.
पदरात दोन मुली असताना ती पुन्हा रस्त्यावर आली. आपले आणि आपल्या दोन्ही मुलींचा उदरनिर्वाह करसा करायचा हा प्रश्‍न अंजनाबाईसमोर उभा राहिला. तिने मुलींच्या साथीने चोरीचा मार्ग स्वीकारला. छोट्या-मोठ्या चोर्‍या करून लोकांच्या पैशांवर डल्ला मारायला लागली. त्यातच रेणूका शिंदे हिचा विवाह झाला. त्यांनतर त्यांनी पैशासाठी लहान मुलांना पळविण्याची आणि त्यांना भिक मागण्यास लावण्याची नामी शक्कल त्यांनी अवलंबली.
चोरीच्या बहाण्याने झोपडपट्टीत, रस्त्यावर चक्कर मारताना लहान मुलांना हेरून त्याला पळवून नेले. झोपडपट्टीतील प्रकरण असल्याने त्याची सुरूवातीला कोणीही दखल घेत नसायचे. पाच वर्षात त्यांनी विविधी ठिकाणांवरून सुमारे 13 बालकांचे अपहरण केले. भिक मागायला विरोध करणार्‍या 9 बालकांची त्यांनी दगडावर आपटून निर्घृणपणे हत्या केली. या हत्येत मायलेकी आणि रेणूका शिंदे हिचा नवराही सामील होता.
छोलिसांना सुगावा लागला आणि अंजलीच्या हातात बेड्या पडल्या. सन 1990 ते 96 या कळात ज्यांनी 43 मुलांचे अपहरण करून त्यातील काही मुलांची हत्या केल्याचे उघड झाले. या खटल्याची जबाबदारी विशेष सरकारी वकिल अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्यावर सोपविण्यात आली.
रेणूकाच्या नवर्‍याला माफीचा साक्षीदार बनविल्यानंतर या मायलेकींना कनिष्ट न्यायालयाने तिघीना फाशीची शिक्षा ठोठावली. त्यावर सन 2001 मध्ये उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. दरम्यान, अंजनाबाई गावित हिचा कारागृहातच मृत्यू झाला. त्यानंतर सर्वोच न्यायालयाने सन 2006 मध्ये या दोघा भगिनींची फाशी कायम केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. तो राष्ट्रपतीने सन 2014 मध्ये फेटाळून लावला होता. त्यानंतर 7 वर्ष फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यास सरकारला अपयश आले होते.

COMMENTS