रात्रशाळा पूर्णवेळ करण्याची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रात्रशाळा पूर्णवेळ करण्याची मागणी

अन्यथा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी शिक्षक सेलचा इशारा

पुणे/प्रतिनिधी :शालेय शिक्षण विभागाने 30 जून 2022 रोजी रात्रशाळा अर्धवेळ करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून, तो निर्णय रद्द करून, रात्रशाळा पूर्णवेळ

रोड क्रॉस करताना भरधाव बाईकने तरुणीला दिली धडक
भंडार्‍यातील आश्रमशाळेत 37 मुलांना विषबाधा
पंतप्रधान करणार नोएडा विमानतळाची पायाभरणी

पुणे/प्रतिनिधी :शालेय शिक्षण विभागाने 30 जून 2022 रोजी रात्रशाळा अर्धवेळ करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून, तो निर्णय रद्द करून, रात्रशाळा पूर्णवेळ करण्याची मागणी राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष अविनाश ताकवले यांनी केली आहे. अन्यथा स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवादिनानिमित्त म्हणजे 15 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलने करून, स्वातंत्र दिन साजरा करू, असा इशारा देखील राष्ट्रवादी शिक्षक सेलकडून देण्यात आला आहे. या निवेदनाची दखल शिक्षण संचालक महेश पालकर यांनी घेतली असून, ही मागणी शासन स्तरावरील धोरणात्मक बाबींशी संबंधित असल्याने ती शिक्षण विभागाच्या सचिवाकडे पुढील विचारासाठी पाठवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी शिक्षक सेलकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 17 मे 2017 च्या शासन निर्णयाचा पुर्नविचार करून, रात्रशाळांबाबत परिपूर्ण धोरण निश्‍चित करण्यासाठी 17 जानेवारी 2022 रोजी शासन निर्णय घेऊन उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने 17 मेच्या शासन निर्णयाचा पुर्नविचार करणे, तसेच रात्र शाळांबाबत परिपूर्ण धोरण निश्‍चित करणे, तसेच रात्रशाळांबाबत शिफारिशी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र या समितीने रात्र शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या हक्कांपासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने 30 जून 2022 रोजी निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयात फक्त दुबारशिक्षकांचे हितसंबंध दिवस शाळेत पूर्णवेळ काम करणार्‍यास रात्रशाळेत अर्धवेळ काम करण्याची संधी देण्यासाठी एकाच व्यक्तीस दीड नोकरी, दीडपगार देण्यासाठीच जपण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे, असा आमचा ठाम विश्‍वास असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
राज्यात 176 रात्रशाळा असून मुंबईत 150हून अधिक रात्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. महाराष्ट्रातील खासगी शाळातील कर्मचारी सेवा-शर्ती नियमानुसार दुबार काम करण्याची सवलत दिली आहे. मात्र, जुन्या निर्णयानुसार रात्रशाळांमध्ये शिक्षक-कर्मचारी मिळून एक हजार 358 दुबार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या. माध्यमिक रात्रशाळेतील 865 दुबार काम करणार्‍या शिक्षकांच्या सेवा समाप्त केल्यानंतर त्यांच्या जागी दिवस शाळेतील 174 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाले. पुरेसे शिक्षक नसल्यामुळे बहुतांश रात्रशाळांमध्ये अध्यापनाचे काम सुरळीत झाले नाही, असे स्पष्ट करून जुना शासन निर्णय रद्द करण्यात आला. दिवस शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रात्रशाळेत होऊ शकत नाही; तसेच अर्धवेळ अध्यापन करणार्‍या शिक्षकांना पूर्णकालीन शिक्षकांचे वेतन देणे कायद्याने शक्य नाही. त्यामुळे 17 मेच्या निर्णयापूर्वी नियमानुसार कार्यरत असलेल्या शिक्षकांना नेमणुका देण्यात येतील. रात्रशाळेत किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहणार आहे. विद्यार्थीसंख्येनुसार संचमान्यता; तसेच अर्धवेळ शिक्षक संख्या निश्‍चित करण्यात येणार आहे. या रिक्त जागांवर नवीन दुबार शिक्षक नेमताना दिवस शाळेतील नियमित शिक्षकाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

पुन्हा अर्धवेळ शिक्षकांचीच नेमणूक
राज्यातील रात्रशाळांमध्ये पूर्णवेळ शिक्षकांऐवजी पुन्हा अर्धवेळ शिक्षकांचीच नेमणूक करणे आणि रात्रशाळांचा कालावधी अडीच तासांचा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. तसेच 17 मे 2017 रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात आला असून, त्याचा रात्रशाळांना फटका बसणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यातील रात्रशाळांच्या व्यवस्थेसंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला. राज्य सरकारने अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यासाठी जुना निर्णय लागू केला. रात्रशाळेतील कामाचा कालावधी वाढवून अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षकाच्या वेतनश्रेणीचे लाभ लागू राहतील, असे निर्णयात नमूद होते.

COMMENTS