Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘सर्वोच्च’ निर्णयानंतरच धनुष्यबाण चिन्हावर निर्णय द्या !

उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई/प्रतिनिधीः शिवसेना नेमकी कुणाची ? पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण कुणाचे यावरील निर्णय अजूनही प्रलंबित असून, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यावरील सुनाव

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासंदर्भातली याचिका फेटाळली | LOKNews24
कर्नाटकात भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू
Nanded : योग्य उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावला – नातेवाईकांचा आरोप (Video)

मुंबई/प्रतिनिधीः शिवसेना नेमकी कुणाची ? पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण कुणाचे यावरील निर्णय अजूनही प्रलंबित असून, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप निर्णय आलेला नसला तरी, निवडणूक आयोग केव्हाही आपला निर्णय जाहीर करू शकतो. मात्र ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निर्णय घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी केली. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेऊ द्यावी, असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारीरोजी संपुष्टात आला आहे.

मातोश्री येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. तसेच त्यांनी यावेळी शिंदे गटावर पुन्हा जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे म्हणाले, गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा हा विकृतपणा आहे. मी दुसर्‍या शिवसेनेला मानतच नाही. राज्यात शिवसेना एकच आहे. केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो. शिवसेनेची एक घटना आहे. त्या घटनेवर पक्ष चालतो. केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर पक्षाचे भवितव्य ठरत असेल तर उद्या कुणीही पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींना खरेदी करू शकतो. थेट पक्षावर दावा ठोकू शकतो. यामुळे लोकशाहीचा बाजार होऊ शकतो. निवडणूक आयोगाने असा बाजार होण्यापासून लोकशाहीला वाचवणे गरजेचे आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाने मागणी केली त्याप्रमाणे आम्ही लाखो सदस्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. केवळ गद्दारांनी दावा केला म्हणून पक्ष गोठवू नये. किमान आता तरी घटनेनुसार पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने मान्यता द्यावी. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत पक्षप्रमुख हे पद मीच तयार केले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून मी या पदावर काम करत आहे. आता जे सोडून गेलेत, त्यांनीच माझी या पदावर निवड केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS