Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जाहीर सभेत अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी

मुंबई प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरु झाला आहे. भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे. महाराष्ट्रात ४५ पेक्

महायुतीचा धर्म सर्वोच्च; नांदेडमध्ये एकसंघतेचा संदेशसंवादातूनच राजकीय प्रश्नांचे निराकरण शक्य; महायुती अधिक बळकट करण्याचा निर्धारराज्यातील जागावाटपाचा निर्णय सर्वांनी स्वीकारावा; नांदेडमध्ये अमरनाथ राजूरकर यांच्याभोवती महायुती एकवटली – खासदार अशोकराव चव्हाणप्रवीण चिखलीकरांचा अर्ज मागे; अमरनाथ राजूरकरांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठिंबा – आमदार  चिखलीकर
भाजपाच्या खा. अशोकराव चव्हाण यांनी सिद्ध केले आपले नेतृत्व व कर्तृत्व
मराठवाड्यातील सहकारी दूध संस्थांसोबत भागीदारीचा निर्णय ‘अमूल’ने घ्यावा; केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांचे स्पष्ट संकेत

मुंबई प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरु झाला आहे. भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे. महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धारही भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. अशात आता अशोक चव्हाण यांच्या भाजपासाठीच्या सभाही चर्चेत आहेत. अशोक चव्हाण भाजपाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांनी नांदेडमध्ये केलेलं भाषण चर्चेत आहे . भाजपाचे जुने लोक आणि काँग्रेसमधून आज भाजपात सहभागी झालेले लोकही आहेत. त्यामुळे आता आपली ताकद डबल होणार आहे. डबल ताकद झाली की मग किसी को देखने की जरुरत नहीं. प्रतापराव और हम अलग थे. सात, दस साल से वो मुझे और मै उनको पानी मे देखते थे. अब हम दोने एकसाथ आ गये. अशोक चव्हाण की ऐसी आदत नहीं की सामनेंसे एक और पिछे एक. जो मै बोलता हूँ वो मै करके दिखाता हूँ. विकासाचं काम असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न. मी आश्वासन पाळणारा माणूस आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी रावडी राठोड स्टाईल अंदाजात म्हटलेला हा डायलॉग चर्चेत आला आहे. अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसची साथ सोडून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर महाविकास आघाडीने त्यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र मी कुणाच्याही टीकेला उत्तर देणार नाही. पक्षासाठी निष्ठेने काम करणार आणि पुढे जाणार अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.

COMMENTS