कोपरगाव : जनता निवडणुकीत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे मोठ्या आशा अपेक्षेने बघत असते.त्यामुळे जे लोकप्रतिनिधी जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करतात

कोपरगाव : जनता निवडणुकीत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे मोठ्या आशा अपेक्षेने बघत असते.त्यामुळे जे लोकप्रतिनिधी जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करतात जनता त्यांना डोक्यावर घेते व जे जनतेला गृहीत धरून फक्त खोटा कळवळा दाखवतात त्यांना घरी बसवते. असाच काहीसा प्रकार कोल्हेंच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे वारीचा पूल झाल्यामुळे वारीसह पंचक्रोशीतील नागरिकांचा मागील चाळीस वर्षाचा वनवास संपला आहे. त्याचा आनंद नागरिकांनी पुलाचे काम तडीस नेणाऱ्या आमदार आशुतोष काळेंना डोक्यावर घेवून नाचत व्यक्त केला. याचे दु:ख कोल्हेंना झाले असून वारीचा पूल झाल्यामुळे नागरिक जरी सुखावले असले तरी लाटेवर निवडून गेलेले कोल्हे मात्र दुखावले असल्याची टीका माजी सभापती मधुकर टेके यांनी केली आहे.मागील चाळीस वर्षापासून रखडलेल्या वारी पुलाचा प्रश्न कोल्हेंना चाळीस वर्ष सत्ता मिळूनही सोडविता आला नाही. तसे पाहिले तर जे आज आपल्यात नाहीत त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही. त्यांनी नेहमीच दुटप्पी भूमिका घेतांना एकीकडे पाणी प्रश्नाबाबत जनतेपुढे टोकाच्या आंदोलनाची भाषा करायची आणि दुसरीकडे स्वत:च पाणी सोडायचे चाक फिरवायला जायचे हे ज्यांनी अनुभवले आहे पाहिले आहे. हे जुने जाणते शेतकरी आजही त्यांचे अनुभव सांगतात. मात्र जरी कोल्हेंना याचा विसर पडलेला असला तरी त्यांच्या अशा वागण्यामुळे नाईलाजाने ते आज आपल्यात नसतांना त्यांच्याबद्दल बोलावे लागते.नेहमीच विषयाला वळण देवून विकास कामावरून नागरिकांचे लक्ष कसे विचलित करायचे हे कोल्हेंकडून शिकण्यासारखे आहे. मात्र जनता आता हुशार झाली आहे. सिंचनासाठी अडीच किलोमीटर पर्यंत पाणी देणारे कोण ? आणि सर्वच शेतकऱ्यांना पाणी देणारे कोण हे शेतकरी व जनतेने ओळखले आहे. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न तुम्हाला चाळीस वर्षात सोडविता आले नाही हे सत्य स्वीकारा आणि ‘जनतेच्या सुखात समाधान शोधायला शिका’ म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही असा सल्ला माजी सभापती मधुकर टेके यांनी दिला आहे.

COMMENTS