Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होणार का? ग्रामस्थांमध्ये संभ्रम

हदगाव तालुक्यातील शिरड येथील गाव तलाव ते पेवा दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा अ

बिल आधी… काम नंतर!4 महिन्यांनंतर ’क्रांक्रिटीकरण’
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला आढावा
नाळेश्वर-जैतापूर रस्त्यावर ‘हायवा’ची अवैध वाहतूक



हदगाव तालुक्यातील शिरड येथील गाव तलाव ते पेवा दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हे काम वेळेत पूर्ण होणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम करून गिट्टी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र एका बाजूला मुरूम टाकून त्यावर गिट्टी अंथरण्यात येत असताना दुसर्‍या बाजूला मुरूम न टाकताच थेट गिट्टी टाकली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. संबंधित ठेकेदाराकडून नियमांना बगल देत केवळ गिट्टी पसरवून काम उरकले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण झाले तरी रस्ता टिकाऊ आणि दर्जेदार राहील का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने कामाची तातडीने पाहणी करून दर्जेदार काम करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

COMMENTS