Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलव्यवस्थापन पंधरवाड्यात कालव्यांचे नुतनीकरण करावे : खंडागळे

बेलापूर : जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिलदरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवाड्या’च्या पार्श्वभूमीवर श्रीर

अकोले बाजार समितीत कांद्याला तेराशे रुपयांचा भाव
अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात मोठा अनर्थ! अहिल्यानगरमध्ये प्रात्यक्षिकादरम्यान हँड ग्रेनेड फुटल्याने प्रचंड खळबळ
माका येथे नारळी सप्ताहाची उत्साहात सांगता

बेलापूर : जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिलदरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवाड्या’च्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील ओढे-नाले, तसेच प्रवरा डावा व उजवा कालवा आणि अंतर्गतच्या चाऱ्यांचे व वॉटर कोर्सचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी केली आहे.
 खंडागळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्य शासन व जलसंपदा विभागाने दुष्काळमुक्त अहिल्यानगर जिल्ह्याचा निर्धार केला असून त्यासाठी हा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या कालावधीत जलसंवर्धनासाठी ओढे-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरणासारखी कामे हाती घेणे अपेक्षित आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील ओढे-नाल्यांवर शासनाने विविध ठिकाणी दगडी साठवण बंधारे, मृदसंधारणांतर्गत सिमेंट काँक्रिटचे आडवे बांध तसेच अशोक कारखान्याच्या माध्यमातून बंधारे उभारण्यात आले आहेत. मात्र गेल्या तीन दशकांत या बंधाऱ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण झालेले नसल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. परिणामी या बंधाऱ्यांची पाणी साठवण व पाझरण्याची क्षमता घटल्याचे निदर्शनास येत आहे.
 ही परिस्थिती लक्षात घेता तालुक्यातील ओढे-नाल्यांचे नूतनीकरण करणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर प्रवरा डावा व उजवा कालवा तसेच त्यांच्या अंतर्गत असलेल्या चाऱ्यांचे व वॉटर कोर्सचेही खोलीकरण, रुंदीकरण व नूतनीकरण करणे गरजेचे आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवाड्या’च्या निमित्ताने ही सर्व कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात यावीत, अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे.

COMMENTS