Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये सीएपीएफच्या 50 तुकड्या पाठविणार ; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना घडतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे आंदोलकांनी मुख्यमंत्री यांच्या वडिलोपार्जित घरांसह इत

राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा
मुंबईत चार दिवस अतिवृष्टीचा इशारा
मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना घडतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे आंदोलकांनी मुख्यमंत्री यांच्या वडिलोपार्जित घरांसह इतर आमदारांच्या घरांना आगी लावण्याचे प्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील आपला प्रचार दौरा अर्धवट सोडत राजधानी दिल्ली गाठली होती. यावेळी सोमवारी झालेल्या बैठकीत मणिपूरच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या अर्थात सीएपीएफच्या 50 तुकड्या मणिपूरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS