पुणे : पुण्यात कमी पावसाच्या अंदाजामुळे पाणीटंचाईचा धोका वाढला असून खडकवासला धरणातील पाणीसाठा टिकवण्यासाठी 15 टक्के पाणी कपातीची शक्यता वर्तवण्या

पुणे : पुण्यात कमी पावसाच्या अंदाजामुळे पाणीटंचाईचा धोका वाढला असून खडकवासला धरणातील पाणीसाठा टिकवण्यासाठी 15 टक्के पाणी कपातीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा मान्सून फार काळ नसल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम पाण्याच्या वापरावर होणार असल्यामुळे एप्रिल महिन्यातून जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये पाणी जपून वापरावे तसेच खडकवासला धरणातील पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत शिल्लक राहील याचं नियोजन करण्याची आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे.

COMMENTS