“या” नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“या” नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला

92 नगरपालिका व4 नगरपंचायतीसाठी 18 ऑगस्टला मतदान

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिका निवडणूक घेण्याचे प्रस्तावित होते, मात्र ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका प्रलंबित होत्या. मात्र आता

अल्पवयीन मुलीस आमीष दाखवून केले अपहरण
Ahmednagar : नगरमध्ये किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी | LOKNews24
भंडारदरा परिसर काजवा महोत्सवासाठी सज्ज

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिका निवडणूक घेण्याचे प्रस्तावित होते, मात्र ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका प्रलंबित होत्या. मात्र आता नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिकेसाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, निवडणूक प्रक्रिया 20 जुलैपासून सुरु होणार आहे, यासंदर्भातील परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यकम बाधित होणार नाही, याची काळजी घेऊन निवडणूक आयोगाने 17 जिल्ह्यातील 77 तालुके निवडले असून, यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहिर केली जाणार असून 4 ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. जेथे आवश्यकता भासेल त्या ठिकाणी 18 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. लगेच दुसर्‍या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार आहेत. यंदा अर्ज माघारी घेणे व प्रत्यक्ष मतदान यात 14 दिवसांचा कालावधी असून प्रचारासाठी दोन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. यंदा प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केलेला असल्याने ती एक नवीन बाब ठरणार आहे.

या 92 नगरपालिकांच्या होणार निवडणूका
अ वर्ग नगरपालिका- भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड व उस्मानाबाद
ब वर्ग नगरपालिका- मनमाड, सिन्नर, येवला, दोंडाईचा वरवाडे, शिरपूर वरवाडे, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, फलटण, इस्लामपूर, विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी वैजनाथ, अहमदपूर, अंजनगाव सुर्जी,
क वर्ग नगरपालिका- चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर, वरणगाव, धरणागाव, एरंणडोल, फैजपूर, पारोळा, यावल, जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी, राजगुरुनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर, म्हसवड, रहिमतपूर, वाई, आष्टा, तासगाव, पलूस, मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, सांगोला, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव, गंगापूर, खुलताबाद, अंबड, भोकरदन, परतूर, गेवराई, किल्लेधारुर, भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूर, औसा, निलंगा, दर्यापूर, देउळगावराजा,
4 नगरपंचायती- नेवासा, मंचर, माळेगाव बुद्रुक, अनगर

अहमदनगर जिल्ह्यातील दहा नगरपालिकांचा समावेश
अहमदनगर जिल्ह्यातील ब वर्गातील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर नगरपरिषद, तर क वर्गातील जामखेड, शेवगाव, देवळाली, पाथर्डी, राहता, राहुरी नगरपरिषद आणि नेवासा या नगरपंचायतीचा यात समावेश आहे.

यंदा प्रथमच उमेदवारांना करावा लागणार ऑनलाईन अर्ज
यंदा निवडणूक आयोगाने नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार असल्यामुळे उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावा लागणार आहे. यासाठी महाऑनलाईनच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून, सर्व संभाव्य उमेदवारांनी या सॉफ्टवेअरद्वारेच नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणूक कार्यक्रम होणार जाहीर – 20 जुलै
नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात- 22 जुलै
नामनिर्देशनपत्र भरण्याचा अंतिम दिनांक – 28 जुलै
नामनिर्देशनपत्राची छाननी -29 जुलै
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक – 4 जुलै
मतदानाचा दिनांक – 18 ऑगस्ट
निकालाचा दिनांक -19 ऑगस्ट

COMMENTS