गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याची देशभरात चर्चा

Homeताज्या बातम्यादेश

गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याची देशभरात चर्चा

राजस्थानातील जयपूरमध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदावरुन बेधडक विधान केलं. जो मुख्यमंत्री बनतो, तो आपल्याला पदावरुन कधी हटवलं जाईल याचा अंदाज नसल्यामुळे टे

राजकारणातून संन्यास घेण्याचा कोणताही विचार नाही ः केंद्रीय मंत्री गडकरी
मुंबई देशाच्या आर्थिक विकासाचा केंद्र बिंदू – गडकरी
राज्यपालांच्या हस्ते नितीन गडकरी यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान

राजस्थानातील जयपूरमध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदावरुन बेधडक विधान केलं. जो मुख्यमंत्री बनतो, तो आपल्याला पदावरुन कधी हटवलं जाईल याचा अंदाज नसल्यामुळे टेन्शनमध्ये असतो, असं नितीन गडकरी म्हणाले. ते राजस्थानातील जयपूरमध्ये आयोजित संसद प्रणाली आणि जन अपेक्षा या कार्यशाळेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद (congress Ghulam Nabi Azad) उपस्थित होते.

नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याची देशभरात चर्चा आहे. कारण नुकतंच गुजरातमध्ये (Gujarat) विजय रुपाणी (Vijay Rupani) यांना हटवून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली आहे.

नितीन गडकरी म्हणाले, “आजकाल प्रत्येकाला समस्या आहेत, प्रत्येकजण दु:खी आहे. आमदार दु:खी आहे कारण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. मंत्री दु:खी आहेत कारण त्यांना चांगलं खातं नाही मिळालं, ज्यांना चांगलं खातं मिळालं ते दु:खी आहेत कारण त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. तर मुख्यमंत्री यासाठी दु:खी आहेत कारण आपण पदावर कधीपर्यंत राहू आणि कधी जाऊ याचा भरवसा नाही”

लोकशाहीचं ध्येय, शेवटच्या व्यक्तीचा विकास
राजस्थान विधानसभेद्वारे आयोजित कार्यक्रमात गडकरींनी सध्याचं राजकारण आणि लोकशाहीच्या मूल्यांवर भाष्य केलं. “राजकारणाचा मुख्य उद्धेश हा सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणं हा आहे. मात्र सध्याचं राजकारण केवळ सत्ता मिळवण्यासाठी सुरु असल्याचं दिसतं. लोकशाहीचं अंतिम ध्येय शेवटच्या व्यक्तीचा विकास आहे”, असं गडकरींनी सांगितलं.

भाजपकडून मुख्यमंत्री बदलाचा सपाटा
दरम्यान, भाजपने अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलाचा सपाटा लावल्याचं चित्र आहे. नुकतंच भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री बदलले. त्याआधी उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याजागी तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. पण काहीच तासात त्यांनाही बदलून पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले. त्याआधी कर्नाटकात येडियुरप्पा यांना हटवून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्यात आलं. तर तिकडे आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांच्याऐवजी हिमंत बिस्वा सरमा यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं.

COMMENTS