Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना संपल्यानंतर आरक्षणासाठी राज्यभर दौरा ; पंकजा मुंडे यांची घोषणा

इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात जोरदार राजकारण रंगले आहे.

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात क्रांती दिन व माझी माती माझा देश अभियान अंतर्गत शपथ घेऊन ग्रंथप्रदर्शन संपन्न 
अनंत करमुसे प्रकरणात आव्हाडांचा पीए तडीपार
Alandi : आळंदीत शासन निर्णयाचे स्वागत

बीड / प्रतिनिधी : इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात जोरदार राजकारण रंगले आहे. भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ओबीसींचे आरक्षण परत मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा पंकजा यांनी दिला.

    गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात पंकजा यांनी कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते डाक पाकिटाचे अनावरण करण्यात आले. गोपीनाथ गडावरुन आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. या वेळी व्यासपीठावरून पंकजा यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर तोड डागली. गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावरुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मुंडेसाहेब आज असते, तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते; पण आज मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. ओबीसी समाजाला न्याय मिळायला हवा. न्याय मागणारा पेटून उठला की न्याय मिळतो. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही एक पत्र लिहिणार असल्याची माहिती पंकजा यांनी या वेळी दिली. त्यात ओबीसींची जनगणना करा, मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुटला पाहिजे आणि ज्याला रोजगार नाही त्याला रोजगार द्या, अशा आशयाची तीन पत्रे आपण पंतप्रधानांना लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंडे असते तर आरक्षण टिकले असते

महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. आज लोकनेते, जननायक गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. त्याचबरोबर आमच्या नेत्याचे डाक पाकीट प्रसिद्ध केल्याबद्दल केंद्र सरकारचे त्यांनी आभार मानले.

COMMENTS