Homeमहाराष्ट्र

केंद्राकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रकार : ना जयंत पाटील

स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे.

मनपाचे वसुली कर्मचारी घेतात हप्ता ; सत्ताधारी नगरसेवकाचा महासभेत जाहीर आरोप
शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
जीडीपीचे दर आठवडयाला दहा हजार कोटींचे नुकसान

इस्लामपूर / प्रतिनिधी : स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्य मंत्री राजेश टोपे व इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असतानाही या संकटाचा मुकाबला करत आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काल प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष प्रतीत होत आहे. यातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रकार दुर्दैवी आहे, अशी खंत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोशल मिडियावरुन व्यक्त केली आहे.  

ना. जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, केवळ महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत आहे. कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही. किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्‍नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का? अशी मनात शंका आहे.

महाराष्ट्राला 85 लाख लसी मिळाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 12.30 कोटी तर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास 4.73 लाख इतकी आहे. गुजरातला मिळाल्यात 80 लाख लसी तिथे लोकसंख्या 6.50 कोटी आहे तर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास 17 हजार देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्या होत्या. मात्र, तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये, अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसत आहे.

COMMENTS