अतिवृष्टीच्या नुकसानीचे पहिल्या हफ्त्याचे ३ कोटी मंजूर : आ. आशुतोष काळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिवृष्टीच्या नुकसानीचे पहिल्या हफ्त्याचे ३ कोटी मंजूर : आ. आशुतोष काळे

  कोपरगाव प्रतिनिधी  :- कोपरगाव विधानसभा मतदार संघात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त श

हभप विठ्ठल महाराज वक्ते यांचे देहावसन
आंबिजळगावमधून तुतारीला जोरदार पसंती : हभप बापूराव निकत
तोतया व्यक्ती उभी करून केले खरेदीखत

 

कोपरगाव प्रतिनिधी  :- कोपरगाव विधानसभा मतदार संघात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देवून भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महाविकास आघाडी सरकारने ऑगस्ट, सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या हफ्त्याचे ३ कोटी ०९ लाख नुकसान भरपाई मंजूर केली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.  

                 चालू वर्षी पावसाने सुरुवातीला वाट पाहिला लावली त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सोयाबीन, बाजरी, मका, आदी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या, मात्र खरीप पिकांच्या काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, बाजरी, मका, आदी खरीप पिकांचे तसेच भाजी पाला व कांदा रोपाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  आजवर नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत केली आहे. शेतकरी अगोदरच अडचणीत असतांना कोपरगाव विधानसभा मतदार संघात परतीच्या पावसाने मोठे नुकसान होवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरुच होता. त्याबाबत राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचे मतदार संघाच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधून मतदार संघात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची दिवाळीच्या आत भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून बाधित शेतकऱ्यांना पहिल्या हफ्त्याचे ३ कोटी ०९ लाख नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. हि रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार असून त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नेहमीप्रमाणे महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, मदत पुनर्वसनमंत्री ना. विजय वडेट्टीवार, मदत पुनर्वसन राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहे.

COMMENTS