Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईकरांवर पाणीकपातीचे सावट

मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांमधील पाणीसाठा आटू लागला असून तलावांमध्ये आजघडीला सरासरी सुमारे 15.57 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे

बाभूळसर खुर्दमध्ये विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
पंतप्रधानांच्या हस्ते 2 सप्टेंबरला ‘सेमिकॉन इंडिया – 2025’ चे उद्घाटन
अलीबाबा दास्तान ए काबूल मालिकेचा सेट जळून खाक

मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांमधील पाणीसाठा आटू लागला असून तलावांमध्ये आजघडीला सरासरी सुमारे 15.57 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी, मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे तलावांतील राखीव कोट्यातील पाण्याचा वापर मुंबईकरांची तहान भागविण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारला केली आहे. दरम्यान, पुढील महिन्यात पाऊस, तलावांतील जलसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

COMMENTS